‘अशी ही बनवा बनवी’मधील अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पत्नीला करावा लागला होता संघर्ष
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 'सौगंध' या चित्रपटातून बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात केली. या पहिल्यावहिल्या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री शांति प्रियाने भूमिका साकारली होती. या चित्रपटातून त्या दोघांनी बॉलिवूडमधील प्रवासाला एकत्र सुरुवात केली होती. अक्षय कुमार सध्याच्या लोकप्रिय अभिनेता आहे. तर शांति प्रिया सध्या काय करते हे फार लोकांना माहित नाही.
सौगंध चित्रपटात काम करण्यापूर्वी शांति प्रियाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सौगंध या चित्रपटानंतरही तिने चित्रपटांमध्ये काम केले. पण तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.
‘एक्के पे एक्का’, ‘मेहेरबान’,’ फूल और अंगार’, ‘मेरे सजना साथ निभाना’, ‘अंधा इंतकाम’, ‘वीरता’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
त्याचप्रमाणे ‘अंजली’, ‘Naaku pellam kaaveri’ इत्यादी तमिळ, तेलुगू चित्रपटात भूमिका साकारली आहे.
शांतिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येही काम केले आहे.
शांति प्रियाने 'अशी ही बनवा बनवी' चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थशी १९९२ मध्ये लग्न केले. त्या दोघांना दोन मुले देखील आहेत. पण २००४ मध्ये सिद्धार्थचे निधन झाले.
त्यानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी शांति प्रियावर पडली. या कठिण काळात शांति प्रियाने हार न मानता ओठावलेल्या परिस्थितीवर मात केली. तिने मुलांना लहानाचे मोठे केले.
२००८ मध्ये शांति प्रियाने छोट्या पडद्यावरील 'माता की चौकी' या मालिकेत काम केले. ‘व्दारकाधीश भगवान श्रीकृष्ण’ य़ा मालिकेतही त्यांनी काम केले.
आता शांति प्रिया लवकरच बिग बॉस पर्व १४ मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जाते.







No comments:
Post a Comment