Vijay Sales [CPS] IN

Saturday, June 13, 2020

रामायण या मालिकेतील हनुमान ची भूमिका साकारणार अभिनेतेे दारा सिंग यांच्या सोबत असलेल्या या चिमुकल्याला ओळखलं का आता झालाय मोठा सुपरस्टार.

रामायण या मालिकेतील हनुमान ची भूमिका साकारणार अभिनेतेे दारा सिंग यांच्या सोबत असलेल्या या चिमुकल्याला ओळखलं का आता झालाय मोठा सुपरस्टार. 

एखाद्याचे त्याच्या बालपणीचा फोटो पाहून त्याला ओळखणे कठीणच आहे. अश्यात, दारा सिंह सोबत या फोटोत दिसणारा हा मुलगा कोण आहे हे आपण ओळखू शकता का ?


अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे झाला होता. अक्षयचे वडील हरी ओम भाटिया हे सैनिकी अधिकारी आणि आईचे नाव अरुणा भाटिया आहे. अक्षयला एक बहिण आहे तीच नाव अलका भाटिया आहे.

खूपच कमी लोकांना माहित असेल की अक्षयकुमारच खर नाव राजीव भाटिया आहे, पण चित्रपटांमध्ये त्याने अक्षय कुमार या नावानेच आपली ओळख बनवली. अक्षयला सुरुवातीपासूनच फिटनेस आणि नृत्याची आवड होती. आपल शिक्षण संपल्यानंतर अक्षयने बँकॉक मधून मार्शल आर्टही शिकला आणि अक्षयने बँकॉकमध्ये शेफ म्हणूनही काम केले होते.


त्यानंतर मुंबईत परत आल्यावर अक्षयने मार्शल आर्ट्स शिकवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी छायाचित्रकार असलेल्या अक्षयच्या एका विद्यार्थ्याने त्याला मॉडेलिंग करायचे सुचवले. त्या विद्यार्थ्याने त्याला एका छोट्या कंपनीत मॉडेलिंगची नेमणूक ही दिली.

अक्षयने १९९१ मध्ये बॉलिवूडमध्ये ‘सौगंध’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती पण त्याचा पहिला हिट चित्रपट १९९२ साली आलेला ‘खिलाडी’ हा होता. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अक्षयने प्रथम अ‍ॅक्शन चित्रपटातील आपली पकड मजबूत केली.

अक्षयने ‘खिलाडी’ मालिकेच्या सर्व चित्रपटांमध्ये आणि ‘मोहरा’, ‘सपूत’, ‘अंगारे’ सारख्या अ‍ॅक्शन चित्रपटात काम केले. पण काही काळानंतर अक्षयने रोमँटिक आणि विनोदी चित्रपटांतही आपली पकड मजबूत केली.

१९९७ मध्ये, यश चोप्राच्या दिल तो पागल है या हिट चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड नामांकन प्राप्त झाले.

१९९९ मध्ये कुमार यांना ‘संघर्ष’ आणि ‘जानवर’ या चित्रपटातील भूमिकांबद्दल त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ‘जानवर’, ‘अंदाज’, ‘धडकन’ आणि ‘नमस्ते लंडन’ ते ‘मुझसे शादी करोगी’, ‘भूल भुलाईया’, ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’ आणि ‘भागम भाग’, ‘हे बेबी’, ‘ वेलकम’ सारखे सर्व चित्रपट सुपरहिट आहेत. २००२ मध्ये ‘अजनबी’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वात्कृष्ट खलनायक म्हणून पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.


चित्रपटाची पार्श्वभूमी नसतानाही अक्षयने आपल्या मेहनतीने आज बॉलिवूडमध्ये एक स्थान मिळवले आहे की त्याची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. ‘सिंह इज किंग’ नंतर अक्षयने सामाजिक मुद्यांवर बनवलेल्या ‘गब्बर इज बॅक’, ‘बेबी’, ‘रुस्तम’, ‘एअरलिफ्ट’, ‘जॉली एलएलबी 2’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’, ‘गोल्ड’, ‘मिशन मंगल’, ‘केसरी’, ‘गुड न्यूज’. यासारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाचे चांगले प्रदर्शन केले.

बॉलिवूडमध्ये नाव मिळवल्यानंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्ना बरोबर लग्न केले आणि आता अक्षयला दोन मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. अक्षयच्या मुलाचे नाव आरव आणि मुलीचे नाव नितारा आहे.

जास्त करून, अक्षय आपल्या दोन मुलांना मिडीयापासून दूर ठेवतो कारण त्याला आपल्या मुलांना सामान्य जीवन द्यायचे आहे आणि ग्लॅमरमुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होईल त्यांना हे नको पाहिजे आहे त्यांच्या ह्या कल्पनेवर प्रत्येक वडिलांना अभिमान होयला पाहिजे.अक्षयच्या आगामी ‘पृथ्वीराज’, ‘सूर्यवंशी’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘अतरंगी रे’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


No comments:

Post a Comment