gurupurnima: का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा ?
देशात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
मुंबई- आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांना मानवंदना दिली जाते. देशात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेते वेळी भावपूर्ण श्रद्धेने गुरुपूजा करून गुरुदक्षिणा देत होते. चारही वेदांवर प्रभुत्व असणा-या व्यास ऋषींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते.
व्यासांनी लोकांना वेदांचे धडे दिले. त्यामुळेच त्यांना आद्यगुरू मानले जाते. तसेच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमाही संबोधले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांचा अंश मानून गुरूंची पूजा केली जाते. गुरू नेहमीच प्रेरणादायी असतात. गुरू कुंभाराप्रमाणे आपल्याला घडवत असतात. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला खरा आकार प्राप्त होतो.
व्यासांनी लोकांना वेदांचे धडे दिले. त्यामुळेच त्यांना आद्यगुरू मानले जाते. तसेच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमाही संबोधले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांचा अंश मानून गुरूंची पूजा केली जाते. गुरू नेहमीच प्रेरणादायी असतात. गुरू कुंभाराप्रमाणे आपल्याला घडवत असतात. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला खरा आकार प्राप्त होतो.

No comments:
Post a Comment