मित्रांनो लग्न करताना मुलगी मुलापेक्ष्या 5- 6 वर्ष्यानी लहान का असावी ? हा बऱ्याच लोकांच्या डोक्यात विचार असतो, की मोठी असली तर काय होत किंवा त्याचे परिणाम काय असतात. पूर्वी लग्न ठरवताना मुलाच्या आणि मुलीच्या वयाचा निकष प्रामुख्याने लावला जात असे. मुलापेक्षा मुली 5-6 वर्ष्यानी लहानच असाव्या मग तुम्ही हा कधी विचार केला आहे का? की या मागे काय कारण असतील. वडील धारी माणसे असे का वागतात. आज लग्नासाठी जाऊन बघा आज या मुली लग्नासाठी वयाचा विचार करत नाहीत.
मात्र या मागे महत्वाचे तीन कारणे होती. पहिले कारण म्हणजे समजूदार, होय मित्रानो हे बघा मुलांच्या तुलनेत मुली समजदार असतात. म्हणजे विवाह नंतर भांडण झाले तरी मुलगी समजदार पणे निर्णय घेते. पण तिचे वय जास्त असेल तर ती समजून घेत नाही, ती dominant राहते. काही काही मुली समजून घेतात, सर्वच मुली नाही समजून घेत. दुसरं अस आहे की वय होय पती पेक्ष्या मुलगी अधिक मोठी दिसू नये, म्हणून त्याच्या पेक्ष्या 5-6 वर्ष लहान मुलीबरोबर लग्न ठरविले जाते. कारण काय होत जर मुलगी मोठी दिसत असेल, ती आपल्याला शोभणार नाही, किव्हा ती त्या पुरुषापेक्षा मोठी दिसून येईल. हे प्रत्येकाला नको असत.
तिसरे असते जबाबदारीचे भान, जर मुलगा मोठा असेल, तर संसारात मदत मिळावी अशी लोकांची अपेक्षा असते. दोघेही संमवयस्कर असतील तर दोघांचाही समतोल राखला जात नाही आणि त्यामुळे थोडीशी भांडण होण्याची शक्यता असते. एक गोष्ट तुमच्या नेहमी लक्ष्यात येत असेल, जर लहान वयाची किंवा खूप वयाची मुलगी असेल, तर संसारात नेहमी भांडण होत असते. हा जो निकष असतो तो सर्वांसाठी नसतो, काही कुदुंब खूप चांगली असतात. मात्र बऱ्याच वेळेला तुम्हाला भांडणे होताना दिसतात.

No comments:
Post a Comment