Vijay Sales [CPS] IN

Saturday, August 29, 2020

Pitru Paksha and Navratri Dates 2020 १६५ वर्षांनी अद्भूत योग : पितृपक्ष व नवरात्रात महिन्याचे अंतर; वाचा

 

सन २०२० हे वर्ष अनेकार्थाने अद्भूत ठरत आहेत. या वर्षीच्या अनेक सण-उत्सवावेळी उत्तमोत्तम योग जुळून येत आहेत. सन २०२० मध्ये बुधवार, ०२ सप्टेंबरपासून पितृपक्षास सुरुवात होणार असून, गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी पितृ पंधरवडा समाप्त होईल. भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येची सांगता झाली की, लगेच दुसऱ्या दिवशी घटनस्थापना म्हणजेच नवरात्रौत्सव प्रारंभ होते. यंदा सन २०२० मध्ये मात्र, सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रात तब्बल एका महिन्याचे अंतर आहे. याचे कारण काय? जाणून घेऊया...


सन २०२० हे वर्ष अनेकार्थाने अद्भूत ठरत आहेत. या वर्षीच्या अनेक सण-उत्सवावेळी उत्तमोत्तम योग जुळून येत आहेत. त्याचप्रमाणे न भूतो न भविष्यति, अशा अनेक घटना सन २०२० मध्ये घडत आहेत. आषाढी एकादशीपासून चातुर्मासास प्रारंभ झाला आहे. यंदाच्या चातुर्मासाचे विशेष महत्त्व म्हणजे हा काळ यावर्षी पाच महिन्यांचा असेल. कारण अश्विन महिना यावर्षी पुरुषोत्तम म्हणजेच अधिक असेल. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणजेच श्राद्धविधीचा मानला जातो. या पितृ पंधरवडा पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ मानला जातो. पितृपक्षात भारतीयांचे दिवंगत पूर्वज वा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे.

मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो. सन २०२० मध्ये बुधवार, ०२ सप्टेंबरपासून पितृपक्षास सुरुवात होणार असून, गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी पितृ पंधरवडा समाप्त होईल. भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येची सांगता झाली की, लगेच दुसऱ्या दिवशी घटनस्थापना म्हणजेच नवरात्रौत्सव प्रारंभ होते. यंदा सन २०२० मध्ये मात्र, सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रात तब्बल एका महिन्याचे अंतर आहे. याचे कारण काय? जाणून घेऊया...

​नवरात्रौत्सवारंभ



श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी करायचे असतात. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण-पूजन महालय श्राद्धात पिंडरूपाने केले जाते. पितृपक्षानंतर लगेचच नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. मात्र, यंदा अश्विन पुरुषोत्तम म्हणजेच अधिक महिना असल्यामुळे नवरात्रौत्सव अधिक अश्विन महिन्यानंतर साजरा केला जाईल. सुमारे १६५ वर्षांनी असा योग आला आहे, अशी माहिती श्री गुरु धाम संस्कृत वेद विद्या पीठम अनुसंधान ट्रस्टचे आचार्य राजेश वत्स यांनी दिली.

सर्वपित्री अमावास्या


इतकेच नव्हे तर १६५ वर्षांनंतर सन २०२० मध्ये एकाच वर्षात लीप इयर आणि अधिक महिना असा अद्भूत योग जुळून आला आहे. चातुर्मास प्रारंभ झाल्यानंतर विवाह, मुंडन, मुंज, कान टोचणे यांसारखी मंगलकार्ये केली जात नाहीत. या चातुर्मासात उपास आणि साधना यांना अधिक महत्त्व असते. चातुर्मासाचा काळ कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला समाप्त होतो. यंदा गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी पितृपक्ष समाप्त होणार आहे. यानंतर शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापना आहे, असेही आचार्य राजेश वत्स यांनी सांगितले.

अधिक अश्विन मासारंभ


अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. सन २०२० मध्ये शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२० रोजी अधिक अश्विन महिना सुरू होत आहे. यामुळे भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येनंतर लगेच घटस्थापना केली जाणार नाही. अधिक महिन्याच्या समाप्तीनंतर नवरात्राला सुरुवात होईल. सन २०२० मध्ये १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्सवारंभ होईल. तर, २६ ऑक्टोबर रोजी दसरा म्हणजचे विजयादशमी, १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी आणि २५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यानंतर चातुर्मास समाप्त होईल.

अधिक मास केव्हा येतो?


पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यास ३६५ दिवस, ६ तास लागतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. हे अंतर तीन वर्षांनी सुमारे एका महिन्याचे होते. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी आणि अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. अतिरिक्त दिवसांचा महिना म्हणूनच याला अधिक महिना म्हटले जाते.

२६ एकादशी


अधिक महिन्याला काही ठिकाणी मलमास असेही म्हणतात. या कालावधीत सूर्य सक्रांत होत नाही. म्हणजे सूर्य राशीपरिवर्तन करीत नाही. त्यामुळे हा महिना मलीन झाला, असे मानले जाते. म्हणूनच याला मलमास असेही म्हणतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सन २०२० मध्ये तब्बल २६ एकादशी असतील.

No comments:

Post a Comment