मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता हे प्रेक्षकांमधील लोकप्रिय पात्र. अण्णा नाईक परत येतात.... अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अण्णा नाईक परत येणार? असे मॅसेज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. रस्त्यांच्या भिंतीवर अण्णा नाईक परत येणार? असा प्रश्न लिहिला जात आहे.
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील दोन्ही भागांनी प्रेक्षकांची मन जिंकली. पहिल्या भागात अण्णा नाईकांच्या नंतर त्यांच कुटुंब कसं राहतं हे दाखवण्यात आलं आहे.
दुसऱ्या भागात पहिल्या भागाचा फ्लॅशबॅक दाखवण्यात आला. यामध्ये अण्णा नाईक आणि शेवंता एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? हे दाखवण्यात आलं आहे.
या दोन्ही भागांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा रंगली आहे.




No comments:
Post a Comment